निसर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

बहकीसी बारीश ने फीर...

हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानां वरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे . सौदामीनीचा लखलकाट, मेघांचा कडकडाट, तृप्तीचे घन, मातीचा सुगंध आणि वार्याची मंजूळ शीळ अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात श्रावणाचे आगमन झाले आहे.
"जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा !
श्रावणात घन निळा बरसला."
कुठे या नर्तक मोराने आपला स्वाभीमानी पिसारा फुलवला आहे. तर कुठे माझ्या कृष्णाने त्याच्या मुरलीचा सुर लावला आहे. कारण आता श्रावण आला आहे. त्या चातकाला जाउनी सांगा कुणीतरी आखेरीस तुझा श्रावण आला आहे.
हा ऋतु असा आहे की कोणाला तरी चींब भीजावस वाटते. तर कोणाला तरी छत्रीतुन भीजताना पहावस वाटत. तर कधी इंद्रधणू च्या रंगा मध्ये रंगुन जाव अस वाटत. पाऊसात वार्यावर फड-फडणारा विहंग होऊन कधी उंच झाडाच्या फांदीवर बसुन ऐटीत  झुलावस वाटत. त्या  नभीचे चुंबन घेउन कधी खळाळणारर्या सरीते मध्ये थेट बुडाव अस देखील वाटत.
"अशाच पावसात कधी मनसोक्त भीजलो सोबतीस घेऊन कोणा"..... अशा आठवणी सुद्धा या श्रावणातच बहरतात.

बहकीसी बारीशने फीर

यादोंकी गठरी खुलवाई,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

कुछ सुनेसे सन्नाटे थे
और ख्वाहीशें दबी दबी
यूँ रखें थे कुछ अरमान
छोड़ा हो जैसे अभी अभी
चद्दर सी उम्मीद मीली
कई जगह थी सील्वाई 
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!

हर सीलवट मे ग्ठरीके
बुनेबुनाये ख्वाब मीले
भीगी चांदनी रातोंके
महकेसे महताब मीले
सीमटीसी खुदहीमे और
इक तहजीब नजर आयी,
मीले चन्द लम्हे घायल
और ढेर सी रुसवाई !!
                 बहकीसी बारीशने फीर अशा कितीतरी नव्या-जुन्या,चांगल्या-वाईट आठवणींना जागे केलेले असते.
" लहानपणी ओढा ओलांडताना बाबांनी पकडलेला हात असो, किवा लपुनछपुन पावसात भीजुन, घरी आल्यावर पाठीवर पडलेला आईचा हात असो. कुण्या जीवलगाचा हातात हात धरुन तासनतास भीजने असो, कधी अशाच पावसात सवंगड्यांच्या हाताची साखळी करुन केलेली मज्जा असो. " प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्यात पावसाची अशी एक तरी वेगळी आठवण असते.
" नवी नाती, नव्या रिती याच पावसाच्या साक्षीने जुळतात. वाट हरवलेली पाखरे याच पावसात पुन्हा मिळतात, रुसलेले-फसलेले क्षण आपसुकच बहरतात, बहराची धुंदी घेऊन तरुवरा प्रमाने लहरतात. कधीही न जुळलेले बंध याच पावसात सलत राहतात, कुण्यातरी वेड्याच्या गालावर आठवणींचे थेंब ढळत असतात."
               कधीतरी... अश्याच पावसाच्या अगणीत थेंबाना आपल्या हाताच्या ओंजळीत धरु पाहणार माझ मन दुरवर कुठे तरी  पोहोचलेल असत. आणि अश्याच कधी काळच्या भीजलेल्या आठवणींना शोधुन-शोधुन मोजत बसलेल असत. मग वेळ कसा नीघुन जातो काहीच कळत नाही. पाऊस मात्र परतीच्या प्रवासाला निघाला आहे हे मन मानत नाही. मध्येच केव्हा लक्षात येत ! "अरे पावसात भीजायच होत, राना-वनांत भटकायच होत, वाफाळता चहा आणि गरमा-गरम भजीचा स्वाद घेत गप्पा गोष्टींत रमायच होत. हे जमल नाही तरी अजुन थोड नहायच बाकी आहे, थोडस बागडायच बाकी आहे, थोड अजुन उंदडायच बाकी आहे, थोडसच धडपडुन मग थोडसच रडायच बाकी आहे पाऊस असताना."

यातल काही जमल नाही तर गुरू ठाकूर म्हणतात तस, 
"झरे मेघ आभाळी तेव्हा, क्षणभर आपुले वय विसरावे.
नाव कागदी घेउन हाती, खुशाल डबक्यात रमावे."

आणि हे सुद्धा नाहीच जमले तर, "व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच जाती,भीजण्याच्या आशेवरती कोमेजुन गेल्या राती" अस म्हणण्याची वेळ येईल एवढ मात्र नक्की.



रविवार, ३० जून, २०१९

निसर्गाच्या गोष्टी

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
                  कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निधळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी  रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर  भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
                विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर  झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही  निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
                       निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(मा.बो. वरील जागू ताई यांच्या निसर्गाच्या गप्पा या धाग्यासाठी लिहिलेले मनोगत)

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...