मंगळवार, ३० जुलै, २०१९

मोड आलेल्या मेथीदाण्याची भाजी



साहित्य:-
एक वाटी मोड आलेले मेथीचे दाणे, कांदा बारीक कापून, टॉमेटो बारीक कापून,फोड्णी साठी हिंग, मोहरी, जीरे आणि कडीपत्ताहळद, मसाला पूड, मीठ,चवीसाठी साखर, खोबरे, कोथिंबीर.

कृती:-


मेथी ही भाजी पाने  बिया (मेथीदाणेया दोन्ही रूपांत वापरली जातेमेथीच्या पानांप्रमाणेच मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी/उसळ चविष्ट लागतेआमच्या कडे थंडी मधे ही भाजी केली जातेचमेथी धूवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

सकाळी पाणी काढून एका जाळीच्या भांड्यात मोड येण्यासाठी झाकून ठेवामेथीदाण्यांना मोड यायला दोन दिवस लागतातरात्री पुन्हा मेथी धुवून परत झाकून ठेवादुसर्या दिवशी मोड आलेले मेथीदाणे भाजी करण्यासाठी तयार आहेत.
कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी द्यामग जीरे आणि हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालाकांदा थोडा फ्राय झाल्यावर बारीक चिरलेला टॉमेटो टाका.टॉमेटो शिजल्यावर मोड आलेले मेथीदाणे टाका.
हळदमसाला आणि मीठ टाकून परतून भाजी झाकून ठेवा आणि वाफेवर शिजण्यासाठी झाकणावर थोडे पाणी घाला
मेथीदाणे शिजल्यावर एक चमचा साखर टाकून गॅस बंद करा.
वरून चिरलेली कोथिंबीर आणि खोबरे टाका.

बुधवार, २४ जुलै, २०१९

नारळीभात





साहित्य-
 तांदूळ  वाटी,नारळाचा चव चव/ किस १ वाटी  गूळ १ वाटी,२ वाट्या पाणी,दोन तीन लवंगा.
ऐछिक साहित्य- वेलचीपूड, केशर,मनुके,चारोळी,बदाम काप,काजू तुकडे.
कृती-
तांदूळ धुवून निथळून घ्यावा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्यावा.त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग गूळ घालुन घ्यावा.यात थोडे पाणी घालून ढवळुन घ्या. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घालून दोनतीन शिट्ट्या काढुन घ्या
वरून बदाम काप, बेदाणे,काजूचे तुकडे इत्यादी घालून सर्व करा.





शनिवार, २० जुलै, २०१९

गोडा मसाला-ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या स्वयंपाकासाठी.


आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी मसाला, मालवणी मसाला वैगरे वैगरे.
असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.यासाठी मी आईनेच शिकवलेल्या पद्धतीने गोडा मसाला नेहमी तयार ठेवते. आपल्याला माहितच असेल की गोडा म्हणजे प्रत्यक्ष गोड चव नसुन हे त्याचं एक नाव आहे. हा नेहमी च्या वापरातला एक कॉमन मसाला आहे. कॉमन यासाठी कारण कडधान्य उसळी पासून ते तिखट आमटी, सुक्क चिकन,मटण, खेकड्यांचा रस्सा तसेच  मच्छी चे कालवन/ तिखल अश्या सगळ्या प्रकारच्या स्वयंपाकासाठी आपण हा मसाला वापरू शकता. रेसिपी झटपट होते. उदा. चण्याची भाजी करायची असेल तर आपण करत असलेल्या फोडणी मध्ये नेहमी प्रमाणे  मोहरी,थोडा कांदा आणि टोमॅटो, यामध्ये हा गोडा मसाला - चमचे तुमच्या अंदाजाने घाला, आणि नंतर हळद, मिरची पावडर, मिठ, गरम मसाला पावडर घालून मस्त रसरशीत चण्याची भाजी होते.
तर याची पाककृती पुढील प्रमाणे आहे.

साहित्य:-मिडियम आकाराचे  कांदे, सुख खोबरं वाटी आणि ओल खोबर वाटी, (तीन कांद्यासाठी एक वाटी खोबरं हे प्रमाण. ओल किंवा सुख कोणत्याही प्रकारे खोबरं वापरु शकता)


लसुण चे कांदे, बोटभर आदरक स्वच्छ धुवून छोटे तुकडे करून घ्यावेत, एक वाटी पुदीना एक वाटी कोथिंबीर स्वच्छ करून घ्यावी. - चमचे तेल. मोठा चमचा मीठ.
कृती:- 
प्रथम कांदे उभे पातळसर कापुन घ्या. गॅस लावुन मंद आचेवर कढई मध्ये - चमचे तेल आणि मीठ घालून त्यात सर्व कांदे मस्त मऊ एकजीव आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्या. जास्त करपु देउन नयेथोडंफार चालेल. मध्ये मध्ये कालथ्याने ढवळुन घ्यावे. हे डिश मध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या.
नंतर किसुन घेतलेलं खोबरं कढई मध्ये घालून सारखे व्यवस्थित ढवळून घ्या. तांबुस सोनेरी रंग आल्यावर गॅस बंद करावा हे देखील थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घ्या. ओल सुख दोन्ही खोबरं वेगवेगळ भाजून घ्या.
आता थंड झाल्यावर कांदे,खोबरं मिक्सर मधून बारीक करून घ्या. आदरक लसूण एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी, तसेच पुदीना आणि कोथिंबीर यांची देखील मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी.

शेवटी वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. आत्ता हा मसाला तयार आहे
डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.

टीप:-
* पानांबरोबर कोंथिबीरी चे कोवळे देठ देखील टाकून देता या मध्ये वापरता येतात.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.


*ओल खोबर भाजायला सुक्या खोबऱ्याचा तुलनेने जास्त वेळ लागतो. एकत्र केल्यास कच्च राहू नये म्हणून ते वेगवेगळे भाजून घ्यावेत.
* वरिला प्रमाण घेऊन अर्धा ते पाऊण किलो मसाला तयार होतो. अर्थात कांदे आणि खोबर वैगरे चां आकार कमी जास्त असु शकतो म्हणून थोडासा फरक पडू शकतो.
*तुमची मसाल्याची पाककृती नक्की शेअर करा.
एक आठवण
पाणी अजिबात वापरले नसल्याने मसाला महिनाभर आरामात टिकतो. खराब होत नाही किंवा चविमध्ये बदल होत नाही.
आई सांगत असते "पुर्वी गावी फ्रीज नसायचे त्या वेळी याच मसाल्या (सुख खोबरं वापरून आणि पुदीना नाही असा केलेला) मध्ये मसाल्याच्या / लाल मिरची पावडर आणि - चमचे मीठ घालून ठेवायचे. १०-१५ दिवस हा मसाला फ्रीज चा बाहेर ठेवला तरीही खराब होत नाही".
साधारण तीन वर्षापूर्वी मी पुण्याला होते तेव्हा ची गोष्ट. पि.जी. राहत असल्याने माझ्या रुम मध्ये फ्रीज न्हवता. त्या वेळी आई असा मसाला बनवुन मला देत असे. जेव्हा मेस च्या भाजीचा कंटाळा यायचा तेव्हा पोळी किंवा भाकरी वरती छोटा मसाल्याचा गोळा असाच ठेवून खाण्यात वेगळाच आनंद होता.

कुडाच्या शेंगांची भाजी


कुडाच्या शेंगां

साहित्य:-
प्रत्येकी एक चमचा तेल, मोहरी, जिरे, हिंग.एक जुडी कुडाच्या शेंगा, दोन कांदे , चार मिरच्या.थोड ओलं खोबरं, मुठभर  कोथिंबीर.
                                                        
कृती :- कुडाच्या शेंगा बारीक चिरून उकडून घ्या. हलक्या हाताने चुरुन आतील पाणी
 पुर्णपणे काढून टाका. कढई मध्येतेल गरम करून त्यात हिंग, जिरे, मोहरी याची फोडणी करावी. यात कांदा, मिरची घालून परतून घ्या.त्यात उकडलेल्या शेंगा टाका. मग चवीपुरतं मीठ टाकून भाजी चांगली परतून घ्यावी. शेवटी खवलेलं ओलंखोबरंकोथिंबीर घालून भाजी खायला घ्या. तांदळाच्या भाकरी बरोबर ही भाजी खायला छान लागते.
याच भाजी मध्ये मिरची ऐवजी लाल तिखट व थोडा स्वच्छ जवळा भाजुन घातला तर हि भाजी अजुनच चवदार करता येते.

रविवार, ३० जून, २०१९

कोकणचा रानमेवा- 'करवंदे'

करवंदे (डोंगराची काळीमैना) KARANDA-
आमच्या गावी एक म्हण आहे, ‘पाडव्याला पाड आणि अखितीला गोड’. "गेल्याच आठवड्यात गावी जाऊन आले, रस्त्याच्या दुतर्फा करवंदाच्या डहाळी च्या डहाळी भरुन आलेल्या पाहील्या. अश्या या रान मेव्यासाठी कोकण प्रसिद्ध आहेच. सर्वसाधारण रानमेवा म्हणजे करवंदे, जांभळे, आंबा, फणस, आवळा, रायआवळे, तोरणं, आमगुळे, आळू ही आहेत. हा रानमेवा आरोग्यरक्षणासाठी सर्वानी आवर्जून खावा. खर्च न करता ही अतीशय उपयुक्त असे हे करवंद मुबलक प्रमानात उपलब्ध असते. अश्या या बहुगुणी फळा बद्द्ल थोडी माहीती".
करवंदाचे मूळ स्थान भारत असून, करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे.

करवंदांचा _n.jpg


निसर्गाच्या गोष्टी

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
                  कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निधळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी  रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर  भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
                विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर  झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही  निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
                       निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(मा.बो. वरील जागू ताई यांच्या निसर्गाच्या गप्पा या धाग्यासाठी लिहिलेले मनोगत)

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय." पण ते शक्य न...